महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञात व्यक्तीने फवारणी टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्ष बागेचे नुकसान - nashik farmer loss news'

वाडगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वामन दिनकर कसबे यांच्या शेतातील कीटकनाशक फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने तणनाशक टाकल्याने तब्बल 3 एकर द्राक्ष बाग जळून 20 लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान
15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान

By

Published : Jan 23, 2021, 11:15 AM IST

नाशिक - वाडगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वामन दिनकर कसबे यांच्या शेतातील कीटकनाशक फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने तणनाशक टाकल्याने तब्बल 3 एकर द्राक्ष बाग जळून 20 लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. निर्यातक्षम द्राक्षावर पोषक द्रव्यांची फवारणी केल्यानंतर बाग सुकत असल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

अज्ञात व्यक्तीने तणनाशक टाकल्याने द्राक्ष बागेचे नुकसान
15 ते 20 लाख रुपयांचे नुकसाननाशिकच्या गिरणारे वाडगाव परीसरातील वामन कसबे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने रात्री त्यांच्या द्राक्ष बागासाठी नियमित फवारणी करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीत तणनाशक औषध टाकल्याने त्यांचा तीन एकरवरील द्राक्ष जळून गेला आहे. त्यामुळे वामन कसबे यांचे तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटावर मात करत वाढवलेला द्राक्ष बाग असा डोळ्या देखत उध्वस्त झाल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. पाच वर्षांपासून वाढलेला द्राक्ष बाग मुळासकट काढून टाकावा लागणार असल्याचं वामन कसबे यांनी सांगितले आहे.
तणनाशक टाकल्याने द्राक्ष बागेचे नुकसान
दोषींवर कठोर कारवाई केली जाणारदरम्यान या प्रकरणी पीडित शेतकऱ्याने नाशिकच्या तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाणार तसेच पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यानी दिली आहे.

ना विमा कंपन्यांची मदत ना सरकारची मदत
वैयक्तिक वाद आणि गावगुंडीच्या राजकारणातून घडलेल्या या प्रकारामुळे या शेतकऱ्याचे पाच वर्षांचे न भरून निघणार नुकसान झाले आहे. यात या शेतकऱ्याला ना विमा कंपन्या मदत करू शकता ना सरकार त्यामुळे हा शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. मात्र या प्रकरणाचे सूत्रधार गजाआड न केल्यास ग्रामीण भागात दुष्मनी काढण्याचा हा नवा पॅटर्न उदयास यायला वेळ लागणार नाही त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पोलीसाकडे केली आहे.

हेही वाचा -चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कट, सिंघू सीमेवरून संशयीत ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details