महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 14, 2019, 10:29 AM IST

ETV Bharat / state

नाशिकमध्ये वाढतेय गुन्हेगारी; पोलीस प्रशासनही बदनाम

मागील आठ दिवसात वेगवेगळ्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे. शहरात गुन्हे घडत असताना पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिकमध्ये गुन्हे वाढले
नाशिकमध्ये गुन्हे वाढले

नाशिक -शहरातील गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. मागील आठ दिवसात वेगवेगळ्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे. शहरात गुन्हे घडत असताना पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिकमध्ये नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर


नाशिक शहरात खून, घरफोडी, एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, अपहरण, मोटारसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे जिल्ह्यात या घटना घडत आहेत. तर या दरम्यान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले. यामुळे पोलीस यंत्रणा काय करत आहे? त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, असा संभ्रम नाशिककरांना पडला आहे.

हेही वाचा - नवा नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू होणार का? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र पोलीस कर्मचारी योग्य पद्धतीने कारवाई करत असल्याचा दावा करत आहेत. काही गुन्ह्यांमध्ये वाढ होत असली, तरी इतर काही गुन्हे कमी करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे म्हणने आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details