नाशिक -जिल्ह्यातील मालेगाव आणि कळवण तालुक्यात घडलेल्या कांदा चोरीच्या घटनांमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि कांदा व्यापाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. चोरीच्या घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काहींनी आपल्या खळ्यात व मळ्यात साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे.
नाशिकमधील कांद्यावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर - कांदा मार्केट नाशिक
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि कांदा व्यापाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. चोरीच्या घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काहिंनी कांद्याच्या चाळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - औसा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा रोष; मुख्यंत्र्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला विरोध
नाशिक जिल्ह्यातून इतर राज्यासोबत विदेशातही कांदा निर्यात केला जातो, सध्या कांद्याला चांगली किंमत मिळत असल्याने चोरट्यांनी त्यांचा मोर्चा कांद्याकडे वळवला आहे. कांदा हा चाळी, खळ्यात, मळ्यात उघड्यावर ठेवलेला असतो. त्यामुळे कांद्यावर सहज चोरट्यांना डल्ला मारता येतो. अशात मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा चोरीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर मनस्तापाशिवाय दुसरा पर्याय नाही.
मालेगाव तालुक्यातील कौळणे आणि कळवणच्या मोकभगणी येथे चोरट्यांनी चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारत कांदा चोरून नेला. यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून काही शेतकऱ्यांनी आपल्या चाळीबाहेर राखणदार ठेवले आहेत. काही व्यापाऱ्यांनी आपल्या कांदा चाळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा - खडसेंना डावलल्याने लेवा समाज आक्रमक; भाजप पक्षश्रेष्ठींचा नोंदवला निषेध