नाशिक -शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार मनमाड शहरात गवळी बांधवांनी पाडव्याला रेड्यांची मिरवणूक काढली. त्यानंतर आज त्यांची झुंज आयोजित करून दिवाळी साजरी करण्यात आली आहे.
देशात व राज्यात दिवाळी साजरी करताना अनेक परंपरा पाळल्या जातात. मनमाड शहरातील गवळी समाजात पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दर वर्षी प्रमाणे यंदाही ही परंपरा पाळत गवळी समाज व शहर दूध संघातर्फे रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील अनेक गवळी बांधव आपले रेडे घेऊन आले होते.