महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2021, 4:50 PM IST

Updated : Mar 24, 2021, 5:05 PM IST

ETV Bharat / state

संतप्त शेतकऱ्यांनी भाजप आमदारालाच ग्रामपंचायत कार्यालयात घातले कोंडून

अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित केले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले भाजपचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घातले.

Angry farmers locked the BJP MLA
Angry farmers locked the BJP MLA

नाशिक - एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित केले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले भाजपचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घातले.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना घडला प्रकार -

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या बीजेपी आमदार दिलीप बोरसे यांना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाने ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कुलूपबंद केले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन पुन्हा जोडले जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमदारांना पडू देणार नाही, असा इशारा देत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता.

संतप्त शेतकऱ्यांनी भाजप आमदारालाच ग्रामपंचायत कार्यालयात घातले कोंडून
तात्काळ वीज जोडणी करण्याचे आमदाराचे आदेश -
हे ही वाचा -राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, चर्चा मात्र होणार सरकारवर झालेल्या आरोपांची?दरम्यान बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातूनच दिलीप बोरसे यांनी फोनवरून महावितरण अधिकाऱ्यांना तात्काळ वीज जोडणी करण्याचे आदेश दिल्याने वीजजोडणीला सुरवात झाली. मात्र आपण शेतकऱ्यांच्या व्यथा अगदी जवळून पाहिल्या असून नेहमीच त्यांच्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी दिले.


हे ही वाचा -वाघांचे मृत्यूसत्र सुरूच; आणखी एक आढळला मृतदेह, तीन महिन्यात १३ वाघांचा मृत्यू
वीज जोडणीला सुरुवात झाल्यानंतर शेतकर्‍यांनी आमदारांना सोडले -

दरम्यान यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या शेतीतील वीज जोडणीला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या शेतकर्‍यांनी आमदार सोडले मात्र एकीकडे अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी अशाप्रकारे त्रास देण्यात येत असल्याने महावितरणाच्या या आडमुठ्या धोरणाचा सटाण्यातील शेतकऱ्यांनी केलेला निषेध सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे.

Last Updated : Mar 24, 2021, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details