महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये गौरी पुजेची तयारी जोरात; बाजारपेठा सजल्या - गौरींच्या आगमनाचे वेध

गणपतीचे आगमन झाल्यानंतर सर्वांना गौरींच्या आगमनाचे वेध लागतात. गौरींच्या प्रतिष्ठापणेसाठी लागणाऱ्या साड्या, अलंकार, मिठाई खरेदीसाठी नाशिकमधील बाजारपेठेत महिलांची लगबग आहे.

नाशिकमधील बाजार पेठेत महिलांची लगबग

By

Published : Sep 4, 2019, 5:10 PM IST

नाशिक -भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीला देशभरात गणपती बाप्पांची स्थापना होते. तीन दिवसानंतर महालक्ष्मी म्हणजे गौरीचे आगमन होते. गौरींच्या प्रतिष्ठापणेसाठी लागणाऱ्या साड्या, अलंकार, मिठाई खरेदीसाठी नाशिकमधील बाजार पेठेत महिलांची लगबग पाहायला मिळत आहे.

नाशिकमधील बाजार पेठेत महिलांची लगबग


गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गौरींना माहेरवाशीण समजले जाते. पहिल्या दिवशी आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यातून गौरी घरात आणल्या जातात.

हेही वाचा - मालेगावात मुसळधार : नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात


घरात सुख-शांती, संपत्ती नांदो अशी प्रार्थना गौरीकडे केली जाते. तसेच या गौरींना आणि तिच्या बाळांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. त्यांचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकण्याची पद्धत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details