महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना दिलासा.. कृषी विभागाकडून २० मेट्रीक टन द्राक्षे, भाजीपाला मुंबईला रवाना - शेतमाल मुंबईकडे रवाना

लॉकडाऊनच्या काळात शेतमाल रानातच पडून राहिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र कृषी विभागाने शेतकरी ते ग्राहक थेट द्राक्षे किंवा इतर भाजीपाला विक्री करण्यासाठी परवानगी दिल्याने शुक्रवारी नाशिकमधून २० मेट्रिक टन द्राक्षे आणि काही भाजीपाला मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.

Agriculture Department  sends 20 metric tons grapes and vegetables to Mumbai
कृषी विभागाकडून २० मेट्रीक टन द्राक्षे, भाजीपाला मुंबईला रवाना

By

Published : Apr 25, 2020, 12:33 PM IST

नाशिक - लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची द्राक्षे ही बागेतच पडून आहेत. काही ठिकाणी विक्री झाली तर काही ठिकाणी वाहतुकीचा फटका बसल्यामुळे जवळजवळ जिल्ह्यातील १,४०० हेक्टर क्षेत्रावरील २८ हजार मेट्रिक टन द्राक्षे बागेतच पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर विक्री करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. मात्र कृषी विभागाने शेतकरी ते ग्राहक थेट द्राक्षे किंवा इतर भाजीपाला विक्री करण्यासाठी परवानगी दिल्याने शुक्रवारी नाशिकमधून २० मेट्रिक टन द्राक्षे आणि काही भाजीपाला मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.

कृषी विभागाकडून २० मेट्रीक टन द्राक्षे, भाजीपाला मुंबईला रवाना

कृषी मंत्री दादा भुसे ही यावेळी म्हणाले, ही द्राक्षे आता शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांचा माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची साखळी तयार करू, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांनाही योग्य दरात भाजीपाला द्राक्षे खरेदी करता येतील. त्यामुळे या संकल्पने संदर्भात कृषी विभाग अग्रेसर राहील असे यावेळी कृषी मंत्र्यांनी सांगितलं.

कृषीमंत्री भुसे म्हणाले, १४०० हेक्टर क्षेत्रावरील २८ हजार मे. टन द्राक्षे शिल्लक होती. त्यापैकी २० मेट्रीक टन द्राक्षे पाठविण्यात येत आहेत. आज सात वाहने द्राक्षे व तीन वाहने भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यसाठी समन्वयाचे काम कृषी विभाग करत आहे. मागील काळात कोकणातील आंब्याला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नव्हता, अशावेळी कृषी विभागाने मध्यस्थी करून हा आंबा मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम केले. त्यामुळे आज आब्यांला चांगले दर मिळत आहेत.

कृषी विभागाकडून २० मेट्रीक टन द्राक्षे, भाजीपाला मुंबईला रवाना
संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाचा सामना करीत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून गावपातळीवर सुद्धा या शेतकऱ्याला स्वत:चा माल थेट बाजारपेठेत, छोटी गावे व मोठ्या शहरामध्ये विक्री करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करतो की, शेतकरी अडचणीत असून, त्याच्या पाठीमागे खंबीर उभे रहा. शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे विकत घ्या. ज्यांची परिस्थिती नसेल अशांना सेवाभाव वृत्तीतून खरेदी करून मोफत द्या, असे आवाहनही भुसे यांनी नागरिकांना केले.
शेतमाल विक्रीची साखळी तयार व्हावी..
भविष्यात शेतकरी ते ग्राहक यांची शेतमाल विक्रीची साखळी तयार व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त भाव मिळावा व शहरातील ग्राहकांनाही योग्य दरात मिळावा, या उद्देशाने ही संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी कृषी विभाग नेहमीच अग्रेसर राहणार असल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details