नंदुरबार- आघाडी सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकार हे अधिक मजबूत आणि एकसंघ असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे निवडक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अनिल देशमुख म्हणाले, की हे सरकार पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपाचे काही लोक हे सरकार पडेल अशा निराधार चर्चा घडवून आणत आहेत, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
'महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल' - नंदुरबार राजकीय बातमी
महाविकास आघाडी सरकार हे मजबूत आहे असे म्हणत हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल, अशा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
!['महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल' बैठकीवेळचे छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9390682-59-9390682-1604225298187.jpg)
बैठकीवेळचे छायाचित्र
बोलताना गृहमंत्री देशमुख
Last Updated : Nov 1, 2020, 8:43 PM IST