नंदुरबार - ऐन पेरणीच्या काळात युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुबलक खते उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र, आता ऐन पेरणीच्या काळात आता जिल्ह्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. पेरणीसोबत युरिया खत महत्वाचा घटक आहे. बियाण्यासोबत युरिया खताचा वापर केला जात असतो. मात्र, शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात खते उपलब्ध नसल्याने खतासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.