महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सूर्य ग्रहणावेळी नमाज पठण करत मुस्लीम बांधवांची शांततेसाठी प्रार्थना

आज (दि. 26) सूर्य ग्रहणावेळी म्हणजे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत तब्बल 5 हजार मुस्लीम समाजबांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. त्यानंतर देशात व जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी प्रार्थना केली.

By

Published : Dec 26, 2019, 5:27 PM IST

Updated : Dec 26, 2019, 6:10 PM IST

नमाज पठण करताना
नमाज पठण करताना

नंदुरबार- शहरातील जामा मस्जिद परिसरात 5 हजार मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सूर्यग्रहण काळात सामूहिक नमाज पठण करून जिल्ह्यात व राज्य देशात शांतता राहावी, अशी प्रार्थना केली.

बोलताना मौलाना जाकीर

समाजात सूर्यग्रहणाविषयी असलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लीम समाजातील शिक्षित युवकांनी हा उपक्रम हाती घेतला होता. शहरातील मच्छीमार्केट परिसरातील जामा मस्जिदीत मौलाना व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (दि. 26 डिसें) दिसणार्‍या सूर्यग्रहणानिमित्त जामा मस्जिद शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज पठण केले. नमाज पठणानंतर देशात व जिल्ह्यात शांतता रहावी, अशी प्रार्थना केली. सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ही प्रार्थना सुरू होती. प्रार्थना संपल्यानंतर मौलाना यांनी प्रवचन केले. देशात व जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी आव्हान देखील केले.

हेही वाचा - नंदुरबार : सारंगखेडा यात्रोत्सवात देशभरातील अश्व व्यापाऱ्यांच्या सहभाग

Last Updated : Dec 26, 2019, 6:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details