महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 18, 2019, 8:39 PM IST

ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी प्रहारचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

निवेदनात संघटनेच्यावतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, पंचनाम्याचा खेळ न करता सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत देणे, गेल्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांना अटक करताना पोलीस

नंदुरबार- जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी. त्याचबरोबर, शासनाने पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सुरू केलेली फसवणूक थांबवावी, अशा मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

मागण्याबाबत सांगताना प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील

प्रहार संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना ४ नोव्हेंबरला निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनात संघटनेच्यावतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, पंचनाम्याचा खेळ न करता सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत देणे, विद्युत पंपासाठी रात्री दिला जाणारा विद्युत पुरवठा दिवसा देणे, गेल्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे त्वरित मिळणे, यासह विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठिय्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना अडविले. पोलिसांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक तीव्र भूमिकेत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा-बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था; दुरुस्त न झाल्यास महामार्ग बंदचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details