नंदुरबार - अक्कलकुवा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. मात्र, या मतदार संघातील मणिबेली या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. गावात मुलभूत सुविधा नसल्याने गावकरी संतापले. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
अक्कलकुवा मतदार संघातील मणिबेली गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज, पाणी व आरोग्य, अशा मुलभूत सुविधांची वाणवा आहे. याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच लोक प्रतिनिधींना वारंवार सूचना करुन निवेदन दिले, आंदोलनही केले. मात्र, गाव आद्याप मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार घातला आहे.