महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2019, 11:48 PM IST

ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे आदिवासी कुटुंबाचे घर कोसळले; जीवितहानी नाही

नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, महिलेसह तीन बालके थडक्यात बचावली आहेत.

नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे.

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे. यामध्ये महिलेसह तीन बालके बचावली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसाने नवापूर तालुक्यातील बिलबारा येथील रहिवासी दानियल वसावे यांचे घर कोसळल्याने संपूर्ण परिवार बेघर झाला आहे. दुपारच्या वेळी ते शेतावर गेल्यानंतर ही घटना घडली आहे. घर कोसळण्याच्या वेळी महिला व तीन बालके घरात होते. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना बाहेर काढले आहे.

नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे.

संपूर्ण घर कोसळल्याने घरातील वस्तू आणि धान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details