नांदेड : समुद्र मंथनातून जी चौदा रत्न बाहेर पडलीत, त्यातील बारावे रत्न म्हणजे (Dhantrayodashi) धन्वंतरी. त्यांनी येताना अमृतकलश सोबत आणला. या अमृतकलशासोबत आयुर्वेद आणला. सत्ययुगात धन्वंतरीच्या आयुर्वेदाचा फायदा केवळ देवादिकांनाच होत असे. या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी (world accepted Ayurveda treatment method) व्हावा म्हणून भगवान विष्णुनं धन्वंतरींना मानवी युगात जन्माला जाण्यास सांगितले. विष्णुच्या आज्ञेवरुन धन्वंतरींनी द्वापारयुगात काशीला धन्वच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे नाव धन्वंतरी पडले. आयुर्वेदात यांनाच धन्वंतरी द्वितीय म्हणून ओळखले जाते. आताचे आयुर्वेदाचे जनक (Dhanwantari is father of Ayurveda) त्यांनाच म्हटले जाते. Today Dhanwantari Jayanti
आधुनिक उपचार पद्धतींनी विज्ञान युगात मोठी प्रगती केली आहे. त्याचा मानवाला चांगला फायदाही होत आहे. त्यासोबतच होमियोपॅथी, युनानी अशा विविध उपचार पद्धतीही उपलब्ध आहेत. या सर्व पद्धतीत आयुर्वेद ही सर्वांत पुरातन आहे. पण विज्ञान युगात उद्भवणाऱ्या व्याधीवरही यात उपचार उपलब्ध आहे, हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिक उपचार पद्धतीत रोगावर इलाज आहे. पण रोग होऊ नये, यासाठी काहीही सांगितलेले नाही. याउलट आयुर्वेदात रोगमुक्त जीवनासाठी आचार संहिता सांगितली आहे. त्या पद्धतीने माणसाने आपले जीवन जगले तर, कोणतीही व्याधी त्याच्या जवळपास फिरकणार नाही. अशी आचार संहिता सांगणारे आयुर्वेद हे एकमेव आहे. त्यामुळे आयुर्वेदाला केवळ उपचार पद्धती न म्हणता भारतीय जीवन पद्धती असे म्हटले जाते.