महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाळ्यातही नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; अद्यापही १५६ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्रतेत वाढ झाली होती.

By

Published : Jul 7, 2019, 8:37 AM IST

जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

नांदेड - जून महिना उलटून गेला तरीही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जिल्हा अजूनही दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ११२२ ठिकाणी विहीर व बोअरचे अधिग्रहण कायम आहे. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जून अखेरपर्यंत पाणी टंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पावसाळ्यातही नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे.

जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्रतेत वाढ झाली होती. जून महिन्यात केवळ आठ टक्केच पाऊस झाला. यामुळे जिल्हा प्रशासनास ३० जूनला पाणी टंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी लागली.

जिल्ह्यात सुरू असलेले १५६ टँकर, तसेच ११२२ ठिकाणी खासगी विहिरी व कूपनलिकेचे अधिगृहण कायम राहणार आहे. दरम्यान, जूनमध्ये झालेल्या पावसामुळे माहूर तालुक्यातील टॅकरच्या संख्येत घट होऊन आठ ऐवजी तीन टँकर सुरू आहेत. सध्या सर्वाधिक ६० टँकर मुखेड तालुक्यात सुरू आहेत.


तालकानिहाय टँकरची संख्या पुढीलप्रमाणे -
नांदेड - २०
भोकर - १
हिमायतनगर - १
उमरी - २
हदगाव - ५
नायगाव - ५ ,
देगलूर - ६
मुखेड - ६०
कंधार - १०
लोहा - ३९
किनवट - ४
माहूर - ३

ABOUT THE AUTHOR

...view details