महाराष्ट्र

maharashtra

एक लाख ३७ हजार शेतकऱ्यांनी उतरविला रब्बी पीकविमा; ८७ हजार हेक्टरला विम्याचे कवच

By

Published : Jan 10, 2020, 8:30 AM IST

सिंचनाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात २ लाख ३३ हजार ८०० हेक्टरवर (१७१.०२ टक्के) रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्र अजून अंतिम झालेले नाही.

rabi-crop-insurance-by-one-lakh-37-thousand-farmers-in-nanded
rabi-crop-insurance-by-one-lakh-37-thousand-farmers-in-nanded

नांदेड- पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार २०६ शेतकऱ्यांनी ८७ हजार ३२७ हेक्टरवरील पिकांसाठी २१९ कोटी ६५ लाख ४० हजार ५७२ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. विमा कंपनीने कृषी विभागाकडे सादर केलेल्या माहितीवरुन हे स्पष्ट झाले आहे.

रब्बी पीकविमा

हेही वाचा-दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण

सिंचनाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात २ लाख ३३ हजार ८०० हेक्टरवर (१७१.०२ टक्के) रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्र अजून अंतिम झालेले नाही. आजवर झालेल्या पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारी २८ हजार ६७१ हेक्टर, गहू २४ हजार ६६७ हेक्टर, हरभरा १ लाख ७३ हजार ७८७ हेक्टर, करडई १ हजार ८८ हेक्टर, मका २ हजार ७३० हेक्टर, सूर्यफूल ४ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. पीकविमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचा समावेश होता. पीकविमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि.३१ डिसेंबर पर्यंत होती. खरीप पाठोपाठ आता रब्बी हंगामातील पिकेही ढगाळ वातावरण, पाऊस व धुक्यामुळे शेतकऱ्यांना काढून टाकण्याची वेळ आली आहे. रब्बी हंगामातील पीक विमा मिळावा, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांतून होत आहे.

विमा काढलेले तालुकानिहाय शेतकरी...

तालुका आकडेवारी
नांदेड २७७२
मुदखेड ४४६
अर्धापूर १७११
हदगाव १८७८०
किनवट ८४
हिमायतनगर ८१९
भोकर ८८
धर्माबाद ७८४
नायगाव ३८३६२
बिलोली ६६६३
देगलूर १५२६२
मुखेड ४६०५०
कंधार ३०५५
लोहा २३३०

ABOUT THE AUTHOR

...view details