नांदेड -विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ब्रिटिशांनाही लाजवेल अशा पद्धतीने राज्य सरकारचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करत आहे. सुरुवातीला लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आता सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू आहे. हे थांबले नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दरेकर यांनी दिला आहे. ते नांदेडमध्ये खा. प्रतापराव चिखलीकर यांच्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वाढीव वीज बिलाबाबत आम्ही आंदोलन केले, मी संपूर्ण राज्याचा दौरा करत आहे. सगळीकडे शेतकऱ्यांची वीज बिलाच्या बाबतीत तक्रार आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता मराठवाड्याचा दौरा करत आहे. अगोदर शेतकऱ्यांना नोटीस द्या, वाढीव वीजबिल दिले असेल तर कमी करा, सरसकट डीपी बंद करू नका. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा नाहीतर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
राजीनामा नाट्य नको?