महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळी वाऱ्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका, काढणीस आलेल्या केळीच्या बागा आडव्या

अर्धापुर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीच्या बागांची पाने फाटून गेली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

By

Published : May 3, 2021, 6:59 PM IST

वादळी वाऱ्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका
वादळी वाऱ्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका

नांदेड - अर्धापुर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीच्या बागांची पाने फाटून गेली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

वादळी वाऱ्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका

रविवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
जिल्ह्यात रविवारी सांयकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. हळदीचा काढणीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. हळद शिजवून उन्हात वाळवणासाठी ठेवलेली हळद भिजली तर फळबागासह उन्हाळी ज्वारी व इतर मोठा फटका बसला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे क्षेत्र असून केळीच्या बागांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसला असून सर्व पाने फाटली आहेत. तर अर्धापूर तालुक्यातील लहान व आंबेगाव परिसरात काढणीस आलेल्या शेतकऱ्यांच्या बागा आडव्या झाल्या आहेत.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा केळीचे क्षेत्र वाढले
अर्धापूर तालुक्याचे क्षेत्र बागायती असल्यामुळे उन्हाळी ज्वारी, ऊस, भुईमूग पिकासह केळीचे पीक घेतले जाते. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी व ऊसाचे पीक आडवे पडली आहेत. तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचे क्षेत्र असून इसापूर व येलदरीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे. यंदा केळीचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

गतवर्षी पासून बसत आहे कोरोनचा फटका
एकीकडे केळीचे क्षेत्र वाढत असताना मात्र गतवर्षी पासून कोरोना आणि कडक निर्बंधांमुळे केळीच्या मार्केटला याचा मोठा फटका बसला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यावर्षी तरी दिलासा मिळेल ही आशा बाळगून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात केळीची लागवड केली होती. केळी काढणीस येणे आणि निर्बंध लागणे यामुळे अगोदरच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी
रविवारी पुन्हा अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या माथी आले. वादळी वाऱ्यामुळे सर्वच भागातील केळीची पाने फाटली. तर लहान व आंबेगाव परीसरात काढणीस आलेल्या केळीच्या बागा आडव्या झाल्या. माझ्याकडे पाच हजार केळीची लागवड असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. तरी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी नागोराव मुदखेडे यांनी केली आहे.

हेही वाचा -एका रात्रीत लशींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही- आदर पुनावाला

ABOUT THE AUTHOR

...view details