महाराष्ट्र

maharashtra

नांदेडमधील खरीप पीकांवर लष्करी अळीचा हल्ला; बळीराजा हतबल

By

Published : Sep 9, 2019, 4:42 AM IST

नुकसान झालेल्या पीकाची पाहणी करून कृषी विभागाने नुकसानीचा पाठपुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशी मागणी शेतकरी आता करत आहेत. अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे येथील शेतकरी म्हणत आहेत.

नांदेडमधील खरीप पीकांवर लष्करी अळीचा हल्ला

नांदेड -खरीप पीकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून हळद, सोयाबीन व कापूस अक्षरश: वाया गेले आहे. आगोदरच अवेळी पडलेल्या पावसाने कशीबशी पेरणी झाली होती. त्यातच आता पीकांचे होणारे नुकसान, यामुळे शेतकरी राजा हतबल झाला असून सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

नांदेडमधील खरीप पीकांवर लष्करी अळीचा हल्ला; बळीराजा हतबल

हेही वाचा - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये जाहीर करावे; शेतकरी नेते जावंधियांचे पंतप्रधान मोदींना पत्र

गेल्या चार वर्षापासून अर्धापूर तालुक्यात अत्यल्प पावसामुळे शेतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खरीप पीकांचे उत्पादन घटले आहे. यंदा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लष्करी आळी व किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, हळद, कापूस आणि तूर या पीकांवर मोठा परिणाम झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे औषध फवारणी करूनही कीड व अळीचा प्रादुर्भाव कमी व्हायला तयार नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत. तसेच आता मोठ्या अर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागणार असल्याचेही शेतकरी म्हणत होते.

हेही वाचा - हातातोंडाशी आलेल्या कोथिंबीरीच्या शेतावर फिरवला ट्रॅक्टर...

हातातोंडाशी आलेला घास आळीच्या प्रादुर्भावामुळे हिसकावला असल्याचे शेतकरी म्हणत आहे. तसेच पीकाची पाहणी करून कृषी विभागाने नुकसानीचा पाठपुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे येथील शेतकरी म्हणत आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे अदानी, अंबानीच्या घशात ; नाना पटोलेंचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details