नांदेड - संचारबंदीच्या काळात रोजंदारी कामगार कष्टकऱ्यांच्या खाण्या-पिण्याची भ्रांत होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात विविध सामाजिक संघटना अशा गरजूंना मदत करत आहेत.
विविध संघटनांप्रमाणेच शहरातील कमल फाऊंडेशन अनेक गरजूंना आधार देत अन्न व धान्याच्या किटचे वाटप करुन अनेक गरजूंना मदत केली आहे. कमल फाऊंडेशन हे नांदेड शहरातील तृतीयपंथीय व काही सामाजिक कार्यकर्ते चालवत आहेत.