नांदेड :अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांना पाणीपुरीतून विषबाधा झाली. लहान बालकासह तब्बल ५७ जणांना हि विषबाधा झाली असून एकच खळबळ उडाली. गावात नेहमीच हा पाणीपुरीचा गाडा गेल्या अनेक वर्षांपासून लावला जातो. आलूच्या भाजीतून ही विषबाधा झाल्याचा अंदाज असून सर्व रुग्णांवर गावात उपचार करण्यात आले असून काही जणांना नांदेडला हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते. पाणीपुरी खाल्यानंतर सर्वांना मळमळ, उलट्या, अतिसार सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने चाभरा, अर्धापूर, नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
ग्रामीण रुग्णालय हलवले : १४ एप्रिल रोजी चाभरा गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरी खाल्ली होती. परंतु १५ एप्रिल रोजी सकाळी मळमळ, उलट्या होण्यास सुरुवात झाली. काही जणांना उलट्या अतिसार सुरू झाल्याने गावकरी घाबरून गेले. काही जणांना उलट्या, अतिसाराचे प्रमाण वाढल्याने त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.