नांदेड -तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यामुळे राज्यात गुटखा विक्री, साठा तसेच वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी नावापूरतीच असल्याचे दिसून येत आहे. शहरातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक गाव खेड्यात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. मात्र याही परिस्थितीत गुटख्यावर पूर्ण बंदी आणावी, यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता दिवस रात्र शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत गुटखा बंदीसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल 166 निवेदने दिली आहेत. बालाजी आबादार असे त्यांचे नाव आहे. आबादार हे आम आदमी पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष देखील आहेत.
दरम्यान गुटखा बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री, सहाय्यक आयुक्त आन्न व औषध प्रशासन, पोलीस अधिक्षक नांदेड, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, आणि पोलीस ठाण्यांना निवेदने दिली मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे त्यानी सांगितले. अन्न व औषध प्रशासन अधूनमधून कारवाई करते, पोलीस छापा टाकतात, त्यानंतर थोड्या दिवसांपूरती गुटखा विक्री थांबते मात्र पुन्हा सुरू केली जाते असे त्यांनी म्हटले आहे.
गुटखाबंदी नावालाच