महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड शहरात मनपाकडूनच कृत्रिम पाणीटंचाई - Artificial water scarcity is conducted by nanded muncipal corporation

शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरीचा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. आतापर्यंत पाच वेळा बंधाऱ्याचे दरवाजे उघडून त्यातील पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाया जात आहे. बंधाऱ्यातील पाणी शहराला पुरवून लोकांची तहान भागविण्याऐवजी शहर मनपाकडून पाणी प्रश्न प्रलंबित ठेवला जात आहे.

नांदेड मनपा

By

Published : Sep 22, 2019, 12:31 PM IST

नांदेड- मनपाने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे. शहराला विष्णुपुरी बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र तरी देखील मनपाकडून शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरीचा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. आतापर्यंत पाच वेळा बंधाऱ्याचे दरवाजे उघडून त्यातील पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाया जात आहे. बंधाऱ्यातील पाणी शहराला पुरवून लोकांची तहान भागविण्याऐवजी शहर मनपाकडून पाणी प्रश्न प्रलंबित ठेवला जात आहे. आता तर आचारसंहिता लागल्याने मनपाने निर्माण केलेली ही कृत्रिम पाणीटंचाई दिवाळीपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा-काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा शिरकाव; अशोक चव्हाणांची पुन्हा एकदा सत्त्वपरीक्षा....!

शहर मनपामध्ये ८१ पैकी तब्बल ७३ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. मात्र एकाही नगरसेवकाने या समस्येकडे लक्ष वेधले नाही. इतकच काय तर सर्वच राजकीय पक्षाचे नेते विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने शहराला जिव्हाळ्याचा असलेल्या पाणी प्रश्नांकडे सर्वांकडूनच दुर्लक्ष होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details