महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2021, 2:13 PM IST

ETV Bharat / state

कृषी दिन विशेष: शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास; नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर !

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शेती फायदेशीर व शाश्‍वत होऊ लागली आहे. शेतीचे तंत्र अधिकाधिक समजावून घेतल्‍याने अनावश्‍यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला. आता शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्‍याकडे शेतकरी कुटुंबाचा कल वाढला आहे. यातून ट्रॅक्‍टर, पेरणीयंत्र, रोटाव्‍हेटर, पंजी, बीबीएफ यंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्र यांच्या माध्यमातून शेती केली जात आहे.

Agriculture Day Special: Farmers embrace modernity; Use of new technology
कृषी दिन विशेष: शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास; नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर !

नांदेड -माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. दिवंगत नाईक यांनी जे हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले होते. ते शेतीमध्ये साकार होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धत सोडून देत आता आधुनिकतेची कास धरली आहे. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणारा शेतकरी आजही आपले कर्तव्य जोपासत जगाला अन्नधान्य पुरवित आहे.

कृषी दिन विशेष: शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास; नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर !

शेती फायदेशीर व शाश्‍वत -

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शेती फायदेशीर व शाश्‍वत होऊ लागली आहे. शेतीचे तंत्र अधिकाधिक समजावून घेतल्‍याने अनावश्‍यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला. आधुनिक अवजारांचा वापर शेतातील उत्‍पन्‍नावर सुधारणा होत आहे. आता शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्‍याकडे शेतकरी कुटुंबाचा कल वाढला आहे. यातून ट्रॅक्‍टर, पेरणीयंत्र, रोटाव्‍हेटर, पंजी, बीबीएफ यंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्र यांच्या माध्यमातून शेती केली जात आहे.

नैसर्गिक आपत्तीशी दोन हात -

साधारणपणे पूर्वापारपासून कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांची लागवड होत असते. कधी नैसर्गिक आपत्‍ती तर कधी कोरड्या दुष्‍काळामुळे पिकांचे नुकसान हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजेलेले असतात. ना नफा ना तोटा लावलेला खर्च तेवढा या शेतीतून निघत असतो. यातून बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा, हवामानाचा, बाजारपेठेचा अभ्‍यास करून शेतीचे नियोजन केल्‍यास शेती फायद्याची ठरू शकते हे त्‍यांनी हेरले. यातूनच शेतीत विविध प्रयोग राबविण्‍यास सुरूवात झाली आहे. आणि आपत्तीशी दोन हात करत शेतकरी हे सर्वांना अन्नधान्य पुरविण्याचे काम करत आहेत.

ठिबक सिंचनाचा वापर वाढला -

बहुतांश भागात धरणाची निर्मिती झाली. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. पण धरणात मुबलक पाणी असूनही ते पाणी सिंचनासाठी पुरत नव्हते. पिकांना पाणी देण्याची जुनी पद्धत असल्यामुळे उत्पादनही वाढत नव्हते. सद्यस्थितीत शेतीत ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन उत्पादनही वाढले आहे. तसेच विहीर कृषीपंपामध्ये सोलारचा वापर वाढला आहे.

पॉलिहाऊस व शेडनेटचा वापर -

शेतीमध्ये कमी क्षेत्रात जास्त उत्पादन होण्यासाठी आच्छादित शेती केली जात आहे. यामध्ये विविध फुले आणि भाजीपाला पिकांचे उत्पन्न वाढत आहे. पॉलिहाऊस शेडनेट, ठिबक, पॉलिमल्‍चिंग (प्‍लास्‍टीक आच्‍छादन) करून भाजीपाला पिके घेण्‍यात येत आहेत. दररोज उत्‍पन्‍न हातात येऊ लागले.

शेती उत्पादक कंपन्याची निर्मिती -

शेतकरी माल पिकवितो पण त्याचा माल विक्री होण्यासाठी प्रचंड अडचणी येतात. तसेच 'विकेल ते पिकेल' या धोरणानुसार शेतकरी उत्पादक कंपन्याची निर्मिती झाली आहे. या माध्यमातून शेतकरी माल पिकवून थेट ग्राहकांना विकत आहेत. त्यामुळे मधील दलालीही कमी झाली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्याचे येणाऱ्या काळात महत्व वाढणार आहे.

उत्पादन वाढले पण शेतकऱ्यांचे उत्पन्न नाही -

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे शेती कसणे सोपे झाले आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनही वाढले आहे. खते, बियाणे आणि मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पन्न मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. त्यातच शेतीला लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत पिकांना बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात खर्चाच्या तुलनेत हमीभाव देण्याची गरज आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - आज कृषी दिन...! महाराष्ट्रात 1 जुलैला का साजरा केला जातो हा दिवस

ABOUT THE AUTHOR

...view details