महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 'एजाज'ची जगण्यासाठी धडपड, उदरनिर्वाहसाठी करतोय मजूरी

नांदेड जिल्ह्यातील पार्डी (ता.अर्धापूर) येथे २०१७ मध्ये स्वत:च्या जीवाची बाजी लावून नदीत बुडणार्‍या दोन मुलींचे प्राण वाचवणार्‍या एजाज अब्दुल रऊफ नदाफ राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने केंद्र सरकारने २०१८ मध्ये गौरवले होते. सध्या त्याच्यावर उदरनिर्वाहसाठी मजूरी करण्याची वेळ आली आहे. ‘तुला ऐवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी, तु मजूरीवर चालला, असे गावातील लोक एजाजला हिनवतात. पण, त्याशिवाय पोटची खळगी कशी भरणार, असा प्रश्‍न तो लोकांसमोर उपस्थित करतो.

By

Published : Aug 9, 2021, 3:12 PM IST

Updated : Aug 9, 2021, 4:43 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

नांदेड - जिल्ह्यातील पार्डी (ता.अर्धापूर) येथे २०१७ मध्ये स्वत:च्या जीवाची बाजी लावून नदीत बुडणार्‍या दोन मुलींचे प्राण वाचवणार्‍या एजाज अब्दुल रऊफ नदाफ राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने केंद्र सरकारने २०१८ मध्ये गौरवले. त्याच्या शौर्याने नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानचा तुरा खोवला गेला. पण, सध्या एजाजला जगण्यासाठी धडपडावे लागत असल्याचे चित्र आहे. ‘तुला ऐवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी, तु मजूरीवर चालला, असे गावातील लोक एजाजला हिनवतात. पण, त्याशिवाय पोटची खळगी कशी भरणार, असा प्रश्‍न तो लोकांसमोर उपस्थित करतो. शासन, प्रशासनाकडूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून प्रत्येक लाभापासून एजाज यांचे कुटुंब वंचित राहिले आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 'एजाज'ची जगण्यासाठी धडपड

२०१८ ला मिळाला होता राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

एजाज हे पार्डी (ता.अर्धापूर) येथील रहिवासी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. एजाज यांचा आई, वडील व एक भाऊ, बहिण, असा परिवार आहे. एजाज हे घरात सर्वात लहान आहेत. येथे ३० एप्रिल, २०१७ मध्ये एजाजने नदीत बुडणार्‍या दोन मुलींचे प्राण वाचवले होते. त्यावेळी तो इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. माध्यमांमुळे त्याच्या शौर्याची गाथा सरकारदरबारी पोहचली. २०१८ मध्ये दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोवींद, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते नदाफला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव

यावेळी सर्वस्तरावून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. त्याच्या शिक्षणाचा खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषदेतही बैठकीत एजाज यांच्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ देण्याचे आश्‍वासनही दिले होते. पण, प्रत्यक्षात मात्र, त्यांना कोणत्याच गोष्टीचा लाभ मिळाला नाही. सरकार शिक्षणाचा खर्च करणार म्हणून एजाज यांच्या वडिलांनी त्यांना नांदेड शहरातील नामांकित महाविद्यालयात इयत्ता ११ वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

शासन, प्रशासनाकडून दुर्लक्ष; प्रत्येक लाभापासून कुटुंब वंचित

सुरुवातीला केंद्रसरकारकडून महाविद्यालयात २० ते ३० हजार रुपये शुल्क जमा झाले. त्यानंतर इयत्ता १२ वीला प्रवेशाच्या वेळी मात्र, पुन्हा मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. शिक्षण शुल्क, राहणे एवढा खर्च करणे शक्य नसल्याने एजाजने याठिकाणचा प्रवेश रद्द करुन गावाजवळ असलेल्या डोंगरकडा येथील महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. यावेळी परिक्षा शुल्क भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे एक वर्ष वाया गेले. २०२१ मध्ये १२ वी उत्तीर्ण होऊन त्याने ८२ टक्के गुण घेतले आहेत. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने इच्छा असूनही तो पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. सध्या तो अर्धापूरमध्ये केळीचे घड वाहणात भरण्याचे काम करत आहे.

सरकारने नोकरी द्यावी

मुलींना वाचवल्या नंतर खूप जणांनी मदत करतो म्हटले होते. पण, कोणीच काही केले नाही. नाजूक परिस्थितीत १२ वी पूर्ण केली. आता सरकारने नोकरी द्यावी, एवढीच अपेक्षा आहे.

हेही वाचा -राज्यपालांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास भेट देवून घेतले पायरीचे दर्शन

Last Updated : Aug 9, 2021, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details