महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolar Lake: पावसाचा जोर कायम! कोलार तलावात सापडले दोन मृतदेह; एकाचा शोध सुरू - dead bodies found in Kolar Lake

सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सध्या नागपूरमध्येही जोरदार पाऊस आहे. मंगळवारी (दि.12 जुलै)रोजी घडलेल्या घटनेनंतर काही तासात तीन मृतदेह मिळून आले होते. ( Two dead bodies found in Kolar Lake ) पण आणखी तिघांचा शोध सुरू होता. आज बुधवार (13 जुलै)रोजी सकाळपासून इंडिआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवली. त्यामध्ये सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तीन मृतदेह मिळाले आहेत.

कोलार तलावात सापडले दोन मृतदेह
कोलार तलावात सापडले दोन मृतदेह

By

Published : Jul 13, 2022, 10:32 PM IST

नागपूर - नागपुर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील नंदा गोमुख आणि छत्रपुर येथील वाहन वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 6 पैकी पाच जणांचे मृतदेह मिळून आले आहेत. मंगळवारी (दि.12 जुलै)रोजी घडलेल्या घटनेनंतर काही तासात तीन मृतदेह मिळून आले होते. पण आणखी तिघांचा शोध सुरू होता. ( Kolar Lake ) आज बुधवार (13 जुलै)रोजी सकाळपासून इंडिआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवली. त्यामध्ये सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तीन मृतदेह मिळाले आहेत.

गुरुवारी सकाळपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू - मिळून आलेल्या मृतदेहात दहा वर्षीय बालक दर्श चौककीकर, दुसरा मृतदेह निमू आठणेर (वय 43) वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. तर (वय 38 वर्षे) कारचा चालक लीलाधर हिवरे याचा मृतदेह आणखीही मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले जाणार आहे. अशी माहिती शोध पथकाने दिली आहे.

सायंकाळी दोन मृतदेह मिळाले - आज सकाळापासूनच या शोधमोहिमेला केळवद पोलिसांच्या बंदोबस्तात शोध मोहीम राबविण्यात आली. यात एनडीआरएफचे जवळपास 25 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते. या पथकाने परिसरातील कोलार तलावाचा पूर्ण भाग शोधून काढला आहे. सायंकाळ होता-होता दोन मृतदेह मिळाले आहेत.

पुराचा पाण्याचा वेग जास्त असल्याने बाहेर काढण्यात अपयश - मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख या गावात एका कारमध्ये सहाजण आले होते. नांदागोमुख येथे व्याही राहत होते. परत जात असताना दुर्घटना घडली आहे. या घटनेत वाहन चालकाचे धाडस नडले आहे. त्याने पाणी वाहत असलेल्या पुलावरून गाडी नेण्याचे धाडक केले. यात जवळपास 20 मिनिट हा थरार पुलावर चालला. अनेकांना दोर फेकून त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. पण पुराचा पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना यातून बाहेर काढण्यात यश आले नाही.

गाडीच्या चालकाचा शोध सुरू आहे - पाण्याचा लोंढा आल्याने त्यासोबत गाडी वाहून गेली. यात सहा जणही वाहून गेले. यात शोध मोहीम घेत रोशनी चौकीकर, वय 32, नागपुर, मधुकर पाटील, 65 , बैतुल, निर्मला मधुकर पाटील, 60, तसेच निर्मला यांची बहीण निमू आठणेर 45 यासुद्धा सोबत होत्या. या तिघांचे मृतदेह मिळून आले असून गाडीचा चालक लीलाधर हिवरे 38 वर्ष याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -Shiv Sena Gurupournima : बंडखोरीनंतर 'अशी' झाली शिवसेनेची 'गुरुपौर्णिमा'

ABOUT THE AUTHOR

...view details