महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दशक्रिया कार्यक्रमासाठी नदीवर गेलेले तिघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला - Nagpur breaking news

दशक्रिया कार्यक्रमासाठी गेलेल्या तरुणाला नदीच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. नदीत उतरताच तो वाहू लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या दोन मित्रांनी नदी उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने

शोध घेताना पथक
शोध घेताना पथक

By

Published : Sep 19, 2020, 9:27 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले कोलार नदीच्या घाटावर दशक्रिया कार्यक्रमासाठी गेलेले तीघे तरुण नदीत वाहून गेल्याचे घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

आकाश राजेंद्र राऊत (वय 25 वर्षे), सानु येरवडे (वय 20 वर्षे) आणि हर्षित यादवान (वय 20 वर्षे), असे वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. तिघेही अजनी पोलीस ठाण्यात हद्दीत राहणारे होते. आकाश राऊत या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून उर्वरित दोघांचा शोध एनडीआरएफ, नागपूर महानगर पालिकेचे पथक आणि पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत वाहून गेलेले तीनही तरुण दशक्रिया कार्यक्रमासाठी किल्ले कोल्हार घाटावर आले होते. त्यापैकी एकाला नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पहिला तरुण नदीत उतरताच तो वाहू लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे दोन मित्र पाण्यात उतरले असता तिघेही वाहून गेले. त्यापैकी आकाशचा मृतदेह पोलिसांना मिळालेला असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -नागपुरात दारूची उधारी बेतली जीवावर, वादातून तरुणाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details