महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 12, 2021, 10:53 PM IST

ETV Bharat / state

'ब्लाईंड रिलीफ असोसिएशन'चे कार्य समाजासाठी आदर्शवत - राज्यपाल

नेत्रहिनांसाठी नागपूर शहरातील 'दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन' निष्ठेने करीत असलेले कार्य, हे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठी आदर्शवत आणि एक मानदंड निर्माण करणारे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शहरातील दक्षिण अंबाझरी मार्गावरील 'दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन'ला भेट दिली. त्यानिमित्ताने संस्थेच्या नवदृष्ट्री सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यपालांची 'ब्लाईंड रिलीफ असोसिएशन'ला भेट
राज्यपालांची 'ब्लाईंड रिलीफ असोसिएशन'ला भेट

नागपूर -नेत्रहिनांसाठी नागपूर शहरातील 'दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन' निष्ठेने करीत असलेले कार्य, हे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठी आदर्शवत आणि एक मानदंड निर्माण करणारे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शहरातील दक्षिण अंबाझरी मार्गावरील 'दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन'ला भेट दिली. त्यानिमित्ताने संस्थेच्या नवदृष्ट्री सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कांडगे उपस्थित होते

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी परिसरातील संस्थेच्या अंध विदयालयास देखील भेट दिली. राज्यपालांनी संस्थेचे संस्थापक स्व.रावसाहेब वामनराव वाडेगावकर यांच्या अर्धकृती पुतळयास अभिवादन करून, तेथील परिसरात वृक्षारोपण सुद्धा केले. अंध विदयालयातील अभ्यासिका, ब्रेल संगणक कक्ष, कार्यशाळेचीही यावेळी त्यांनी पाहणी केली.

'ब्लाईंड रिलीफ असोसिएशन'चे कार्य समाजासाठी आदर्शवत - राज्यपाल

दिव्यांग हे उच्च प्रतिभेचे धनी - राज्यपाल

सूरदासांच्या अवीट रचनांचा दाखला देत कोश्यारी म्हणाले की, दिव्यांग हे उच्च प्रतिभेचे धनी असतात. समाजात आजुबाजुला शारीरिक व्यंगत्व असणाऱ्यांकडे कलेचे विशेष अंग असल्याचे दिसून येते. त्यांचा न्यूनगंड दूर करून, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू असलेले संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. नेत्रहीनांना स्वावलंबी करणारी दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन ही दिव्यांग विकासाचे देशातील उत्कृष्ट मॉडेल ठरवू शकणारी संस्था आहे. 1928 पासून नेत्रहीनांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली ही संस्था आजही तितक्याच निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करत आहे. मानवसेवा हीच ईशसेवा असल्याचे सांगून भविष्यात संस्थेला अपेक्षित सहकार्य करणार असल्याचे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

हेही वाचा -भाजपकडून ओबीसींचा घात; नाना पटोले यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details