नागपूर - आरेच्या जंगलातील वन-जमीन शिवसेना खासगी विकासकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप खोटा आहे, असे आमदार सुनिल प्रभू यांनी सांगितले आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केल्यानंतर शिवसेनेकडून या आरोपाला उत्तर देण्यात आले.
आरेच्या वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात वनीकरण व्हावे तसेच तिथे पिढ्यानपिढ्या आदिवासी पाड्यात राहत असलेल्या वस्त्यांचा विकास व्हावा, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, तरीदेखील भाजपने या विषयाचा विपर्यास करून धादांत खोटे आरोप केला, असे आमदार प्रभू म्हणाले.