महाराष्ट्र

maharashtra

कोणी कितीही स्ट्रॅटजी तयार केली तरी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार - देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 12, 2021, 5:30 PM IST

कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, कोणी कितीही स्ट्रॅटजी तयार केली तरी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकी नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, यात शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Modi will be Prime Minister Devendra Fadnavis
नक्षली पत्राची चौकशी देवेंद्र फडणवीस

नागपूर -राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी दरम्यान कोणत्या विषयांवर खलबत झाले असतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, कोणी कितीही स्ट्रॅटजी तयार केली तरी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकी नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, यात शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

हेही वाचा -अघोरी खंडणी प्रकरण: काकासोबतच्या वादाचा वचपा काढण्यासाठी पुतण्या राजचा खून

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईमध्ये पाणी तुंबल्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यावर, या सरकारच्या नेत्यांना सकाळी उठून जे वाक्य सर्वात आधी तोंडात येते, ते म्हणजे अमुक बाबीसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

नक्षली पत्राची चौकशी झाली पाहिजे

नक्षल विचार हा मुळातच विविध समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे. त्यामुळे, नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या पत्रकाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

वारीला परवानगी द्यायला हवी होती

कमी उपस्थितीत निघणाऱ्या पायी वारी संदर्भात वारकऱ्यांना परवानगी द्यायला हवी होती. मुळातच त्यांनी पन्नास लोकांच्या उपस्थितीत वारीची परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांचे ठरावही घेतले होते की, कुणीही वारीच्या मार्गात येणार नाही, तेव्हा सरकारने परवानगी द्यायला हवी होती, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मराठा आंदोलनात भाजप नेते सहभागी होतील

मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनात भाजपचे नेते सहभागी होते. यापूर्वीही आमचे सरकार असताना ज्या ज्या ठिकाणी मराठा मोर्चे निघायचे तिथले आमदार त्या मोर्चामध्ये सहभागी होत होते. समाजाच्या मागणीला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असणे स्वाभाविक आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -राज्यपाल नागपूर दौऱ्यावर; विविध कार्यक्रमात होणार सहभागी

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details