महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर रब्बीच्या ६५ टक्के उत्पादनात घट, डाळींना मोठा फटका

दुष्काळाचे परिणाम शासनाला माहित आहेत. तरी महागाई ही निवडणुकीनंतरच का वाढली ?  तीन महिने त्याचा बाजारपेठेवर परिणाम का दिसला नाही ? असा सवाल व्यापारी आणि ग्राहनकांकडून उपस्थित केला जात आहे.

By

Published : Jun 12, 2019, 4:58 PM IST

डाळींना किंमती वाढल्या

नागपूर - सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. आता याच दुष्काळाचा परिणाम अन्नधान्यांवरही होत आहे. दुष्काळामुळे राज्यात रब्बीच्या उत्पादनात साधारण ६३ टक्के घट झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर होताना दिसत आहे. या दुष्काळाचा सर्वाधिक फटका डाळींच्या उत्पादनाला बसला आहे. उत्पादन घटल्याने तूर, मूग आणि उडिदाच्या डाळींच्या किंमतीत प्रति किलो ६ ते १० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

नागपूर रब्बीच्या ६५ टक्के उत्पादनात घट.

दुष्काळाचे परिणाम शासनाला माहित आहेत. तरी महागाई ही निवडणुकीनंतरच का वाढली ? तीन महिने त्याचा बाजारपेठेवर परिणाम का दिसला नाही ? असा सवाल व्यापारी आणि ग्राहनकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण प्रोटीन मिळणारे खाद्यपदार्थ म्हणून गरीबांना डाळिंशिवाय पर्याय नाही. अशात डाळिंच्या वाढलेल्या किंमतीने सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटवर चांगलाच परिणाम झाला आहे. एवढेच नव्हे, तर येत्या काळात डाळिंच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे..

डाळींच्या पूर्वीचे आणि सध्याचे भाव खालील प्रमाणे -
डाळ सध्याचे भाव पूर्वीचे दर
तुर ९६-९८ रु. किलो ९२ रु. किलो
मूग ८१ रु. किलो ७१ रु. किलो
उडीद ९९ रु. किलो ९० रु. किलो

ABOUT THE AUTHOR

...view details