महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 9, 2019, 7:13 PM IST

ETV Bharat / state

नवतपा संपूनही उष्णतेची लाट कायम...नागपूर पुन्हा 'रेड अलर्ट' वर

विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेमुळे होणारी होरपळ अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. वळवाच्या पावसानंतर देखील उष्णतेची लाट कायम आहे.

उष्णतेची लाट

नागपूर- विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेमुळे होणारी होरपळ अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. वळवाच्या पावसानंतर देखील उष्णतेची लाट कायम आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा नागपुरात रेड अलर्ट जाहीर केला आहे. आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिल्याने नागपूरकरांना तापमान कमी होण्याची वाट पहावी लागणार आहे.

एस. साहू हवामान विभाग अधिकारी

तापमान ४५ अंश सेल्सिअसवर असल्याने वातावराणात उष्णता कायम आहे. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण कोरडय़ा वाऱ्यामुळे उन्हाची दाहकता वाढत असल्याने सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरन निर्माण होते आहे. नवतपा संपल्यानंतरही तापमान कमी झाले नाही. शरीराला झोंबणारे ऊन अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे दमटपणा आणखी वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या वातावरणात बदल होत आहेत. सकाळच्या सुमारास काही काळ आकाशात ढग दाटून येतात. मात्र, दिवस जसजसा वाढतो तसतशी सूर्याची किरणे आणखी प्रखर होतात. परत दुपारी ४ वाजताच्या सुमारास वातावरण ढगाळ होते. या वातावरणामुळे गर्मीचा आणखीनच त्रास नागरिकांना होत आहे. शहरातील हे वातावरण येणाऱ्या १२ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details