नागपूर -नुकतेच काही वृत्तमाध्यमांतर्फे एनसीआरबीचा अहवाल सांगण्यात आला. यामध्ये गुन्ह्यात नागपूर हे पाटण्यानंतर येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या अहवालातील आकडेवारीमध्ये तफावत आहे. हा अहवाल २०१९ चा आहे. नागपूरची जनसंख्या ही मधल्याकाळात २५ लाख होती. मात्र, त्यात कामठी आणि हिंगणा हे पोलीस स्टेशनसुद्धा समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे, एकून जनसंख्या ३० लाख इतकी झाली आहे. त्यामुळे, सदर अहवालातील महितीत तफावत असून नागपुरातील गुन्हेगारीत 15 टक्क्यांनी घट झाल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी चांगली कामगिरी केल्याबद्दल देशमुख यांनी नागपूर पोलिसांचे कौतुक केले. २०१९ मध्ये ९० गुन्हे दाखल झाले होते. तेच २०२० मध्ये ८८ गुन्हे दाखल झाले. २०१९ मध्ये भाग पाचमध्ये ७ हजार ७३४ गंभीर गुन्हे तर, २०२० मध्ये ६ हजार १९१ गुन्ह्याची नोंद झाली. यात दरोड्याच्या घटनांचा आकडा हा १५ वरून १९ झाला. जबरी चोरीचे १४७ गुन्हे होते. त्यात घट होत १२७ गुन्हे दाखल झाले आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनेत ६५ टक्क्यांनी घट झाली आहे. बलात्काराच्या घटना पाहाता मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
हेही वाचा -नागपूर जळीतहत्याकांड प्रकरणी प्रियकराला अटक