महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 24, 2021, 10:19 PM IST

ETV Bharat / state

कोरोनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या न्यूट्रीशन क्लबवर महापौरांची धाड; २५ हजारांचा दंड

महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी जुना सुभेदार ले-आऊट, शारदा चौक येथील इम्युनिटी बुस्टर हेल्थ ड्रिंक विकणाऱ्या क्लबमध्ये छापा टाकला. यावेळी क्लबमध्ये कोरोनाच्या दिशानिर्देशांचे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

Club raid Mayor Nagpur
क्लब छापा महापौर नागपूर

नागपूर -महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी जुना सुभेदार ले-आऊट, शारदा चौक येथील इम्युनिटी बुस्टर हेल्थ ड्रिंक विकणाऱ्या क्लबमध्ये छापा टाकला. यावेळी क्लबमध्ये कोरोनाच्या दिशानिर्देशांचे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -संपत्तीच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून

एका छोट्याशा खोलीत नागरिकांना कोरोना प्रतिबंधक इम्युनिटी बुस्टर सांगून काढा व ड्रिंक दिले जात असल्याची माहिती रात्री महापौरांना प्राप्त झाली होती. क्लबचे संचालक सुमित मलिक यांनी काढा घेतल्यानंतर मास्कही लावण्याची गरज नसल्याचा दावा केला होता. सूचनेची गंभीर दखल घेऊन महापौरांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, छोट्याशा ४५० वर्ग फुटाच्या खोलीत १५० पेक्षा जास्त लोक जमा असल्याचे दिसून आले. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता, तसेच सामाजिक अंतराचे पालनही करण्यात येत नव्हते.

संस्थेच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश

शासनाच्या दिशानिर्देशांची पायमल्ली उडविताना बघितल्यानंतर महापौरांनी उपद्रव शोध पथकाच्या जवानांना दंड लावण्याची सूचना केली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकल्यामुळे महापौरांनी क्लब संचालकाला चांगलेच फटकारले. अशा प्रकारे नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या संस्थेविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

२५ हजारांचा दंड वसूल

महापौर दयाशंकर तिवारी आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी ‘हेल्थ ड्रिंक’ विकणारे क्लब संचालक सुमित मलिक यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला. महापौर आणि शोध पथकांच्या जवानांना पाहताच क्लबमधील नागरिकांनी पळ काढला.

नागरिकांची बेफिकिरी धोकादायक ठरणार

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही, ही चिंतेची व अत्यंत धोकादायक बाब आहे. नागरिकांचा थोडासा बेजबाबदारपणा हा कुणाच्या जिवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे, स्वत:सह इतरांनाही धोका ठरू नये, यासाठी प्रत्येकाने शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

हेही वाचा -डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील १६ जणांना कोरोना

ABOUT THE AUTHOR

...view details