महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर, पुणे आणि नागपूरमध्येही नाईट लाईफचा विचार करू - mumbai night life

मुंबईत नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मंजुरी मिळाली असून आजपासून मुबंई २४ तास सुरू राहणार आहे. यामध्ये मुंबईतील मर्यादित भागात जसे मॉल, मिल कंपाऊंड सोबत नरिमन पॉईंट बीकेसी हे परिसर २४ तास सुरू राहतील. जिथे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न राहणार नाही, अशा ठिकाणी नाईट लाईफ सुरू राहणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. भविष्यात मुंबईचा हा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या दिवसात पुणे, नागपूरमध्ये देखील नाईट लाईफ सुरू करण्याचा विचार करू अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख, गृहमंत्री
अनिल देशमुख, गृहमंत्री

By

Published : Jan 27, 2020, 5:26 PM IST

नागपूर - मुंबई नाईट लाईफला म्हणजेच 'मुंबई २४ तास'ला आजपासून(सोमवार) सुरुवात होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. यामध्ये मुंबईतील मॉल, नरिमन पॉईंट आणि बीकेसी या परिसरात नाईट लाईफ सुरू राहील. पोलिसांनाही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आखणी चोख व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राज्य शासनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काळजी घेणार असल्याचे देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबईत नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मंजुरी मिळाली असून आजपासून मुबंई २४ तास सुरू राहणार आहे. यामध्ये मुंबईतील मर्यादित भागात जसे मॉल, मिल कंपाऊंड सोबत नरिमन पॉईंट बीकेसी हे परिसर २४ तास सुरू राहतील. जिथे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न राहणार नाही, अशा ठिकाणी नाईट लाईफ सुरू राहणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. भविष्यात मुंबईचा हा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या दिवसात पुणे, नागपूरमध्ये देखील नाईट लाईफ सुरू करण्याचा विचार करू अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

नागपूरवरून क्राईम कॅपीटल' चा ठपका पुसू-

तसेच, नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, याबाबत प्रश्न विचारला असता, येत्या काळात 'नागपूरवरून क्राईम कॅपीटल' चा ठपका पुसून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू असून ते पुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही , असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा - मनसेच्या बैठकीत 9 फेब्रुवारीच्या मोर्चाची चर्चा.. शॅडो कॅबिनेटची घोषणाही लवकरच

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक नसून हे प्रत्येकावर अवलंबून असेल असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -'धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील'

ABOUT THE AUTHOR

...view details