महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2019, 9:04 PM IST

ETV Bharat / state

नागपुरात कडक पोलीस बंदोबस्तात होणार गणपती विसर्जन

गणपती बाप्पाच्या सेवेनंतर आता त्यांना निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. त्यासाठी शहरात संपूर्ण आवश्यक तयारी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शहरातील फुटाळा तलावात विसर्जन करता येणार आहे. मात्र, इतर तलावात विसर्जन करण्यावर बंदी आहे. शहराच्या विविध भागात कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात आली असून लोकांना ते शोधता यावे यासाठी महापालिकेने एक अँप सुद्धा तयार केले आहे.

गणपती विसर्जन

नागपूर- जिल्ह्यात गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तर शहरभर कडेकोट पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी गणपती विसर्जनासाठी शहरातील फुटाळा तलावाचा वापर करता येणार आहे. मात्र इतर तलावात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

माहिती देताना शहराचे अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर

गणपती बाप्पाच्या सेवेनंतर आता त्यांना निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. त्यासाठी शहरात संपूर्ण आवश्यक तयारी करण्यात आली आहे. विसर्जनाचा पूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडवे याची महापालिका आणि पोलीस खात्यावर मोठी जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने शहरातील फुटाळा तलावात विसर्जन करता येणार आहे. मात्र, इतर तलावात विसर्जन करण्यावर बंदी आहे. शहराच्या विविध भागात कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात आली असून लोकांना ते शोधता यावे यासाठी महापालिकेने एक अँपसुद्धा तयार केले आहे. त्या माध्यमातून लोकांना बाप्पाच्या विसर्जनासाठी घरा जवळ कृत्रिम टँक शोधता येणार आहे.

हेही वाचा- गड किल्ल्यांच्या मुद्यावरून वैयक्तिक स्तरावर ट्रोल करण्यात येत असून हे चुकीचे - खासदार अमोल कोल्हे

शहरात मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी राहणार आहे. त्यामुळे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असून शहरात सर्वत्र लागलेल्या स्मार्ट सिटी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तर फुटाळा तलाव परिसरात सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शहरात १७०० पोलीस कर्मचारी पूर्ण दिवस नजर ठेवून राहणार आहे. एक एसआरपीएफची तुकडीसुद्धा सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात राहणार आहे. कडेकोट बंदोबस्तात गणपती विसर्जन पार पडणार असून त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-नागपूर : आता ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार मुख्याध्यापक.. विद्यार्थ्यांचं नुकसान?

ABOUT THE AUTHOR

...view details