महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 26, 2023, 8:12 PM IST

Updated : Apr 26, 2023, 11:10 PM IST

ETV Bharat / state

Political Crisis In Maharashtra : सत्तासंघर्षावर अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नागपुरात, मोठे राजकीय संकेत

सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांचे पुढील राजकीय भविष्य काय ठरवणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. पात्र-अपात्रतेचा निकालाचा जोगवा कोणाच्या पारड्यात पडतो, यावर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा कशी असेल हे निश्चित होणार आहे. त्यामुळे अमित शहा, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपुरात उद्या भेट होणार आहे.

Political Crisis In Maharashtra
Political Crisis In Maharashtra

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

नागपूर :महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो. त्यामुळे हा सत्तासंघर्ष अगदी शेवटच्या वळणावर आला असताना सर्वांचीचं धाकधूक वाढलेली आहे. अशा परिस्थितीत भाजपचे चाणक्य अमित शहा, भाजचे गेम-चेंजर नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या नागपुरात भेट होणार आहे. निमित्त आहे नागपुरात तयार झालेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन सोहळ्याचे. मात्र, उद्घाटन सोहळा जरी उद्या असला तरी, तीनही नेते नागपूरला येण्यामागे मोठे राजकीय संकेत मिळत आहेत. अनेक अर्थानी तीन नेत्यांच्या भेटीकडे बघितले जात आहे. अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे रात्रभर नागपुरत मुक्कामी असल्याने सत्तासंघर्षावर राजकीय खलबते देखील होणार असल्याने राजकीय नेत्यांसह विश्लेषकांचे डोळे नागपूरकडे लागले आहेत.

नाराज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष :राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोरात सुरू झाल्यापासूनच एकनाथ शिंदे कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे भाजपवर नाराज असल्याचे ‘सामना’ या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात म्हटले आहे. नाराजीमुळे शिंदे त्यांच्या गावी गेले आहेत. शिंदे तेथे तीन दिवस सुट्टीवर घालवणार आहेत. सामनामध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदार भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, आयुष्यभर राष्ट्रवादीत राहणार असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची चर्चा :एवढे सगळे होऊनही शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची चर्चा दिल्लीत सुरू झाली. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांसाठी त्यांच्या गावी गेले आहेत. सामनात पुढे लिहिले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या नाराजीच्या प्रश्नाला पाच शब्दांत उत्तर दिले असुन प्रकरण तहकूब केले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटनेते उद्योगमंत्री उदय सावंत यांनीही शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री रागाच्या भरात गावी गेले आहेत का? माध्यमांच्या या प्रश्नावर उदय सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात जत्रा असते. दुसरीकडे गावच्या जत्रेला गेल्यावर मुख्यमंत्र्यांना राग येतो असे कोणी म्हणत असेल तर त्यांचा जाहीर सत्कार करायला हवा. दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्यासाठी बैठक होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माध्यमांच्या या प्रश्नावर उदय सावंत म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत, मात्र त्यात तथ्य नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी लॉबिंग केल्याचे सांगितले जात आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजचे वास्तव आहे.

जाणीवपूर्वक अफवा पेरण्याचे विरोधकांचे काम :अफवा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे ते रजा घेऊन आपल्या गावी गेल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शहा येणार असल्याने एकनाथ शिंदे नागपुरात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ते तीव्र नाराजी व्यक्त करतील अशीही शक्यता आहे. शिवाय सत्तासंघर्षात 16 आमदार अपात्र ठरले तर पुढील राजकीय वाटचाल नक्की काय असणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

नागपुरात लागले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारचे बॅनर : कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले आहेत. सत्तासंघर्षात आपले नेते मुख्यमंत्री होतील, अशी आशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे आता नागपुरात बॅनरची लढाई सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. त्यामुळे सत्तेच्या जवळचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय खलबते सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेमुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता असल्याने विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री कोण असणार असे प्रश्न पडत आहेत.

हेही वाचा - Uday Samant Met Sharad Pawar : बारसू संदर्भात शरद पवार आणि उदय सामंत यांच्यात खलबते?

Last Updated : Apr 26, 2023, 11:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details