नागपूर- महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला आहे. भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तर अनेक मागण्या घेऊन विधानभवनावर एकूण 4 मोर्चे धडकले. या मोर्चांमध्ये लक्षवेधी मोर्चा होता तो महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचा. अनुदान मंजूर झालेल्या उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे, ही प्रमुख मागणी या आंदोलकांनी केली.
हेही वाचा - कोस्टल हायवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट - एकनाथ शिंदे
गेल्या 18 वर्षांपासून या शिक्षकांना दमडीसुद्धा मिळत नाही, कोणी वेटरचे काम करतो आहे, तर कोणी शेती करत आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.