मुंबई -पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय सोमवारी विद्यापीठ आयोगाने(युजीसीने) घेतला आहे. या निर्णयाला युवासेनेने विरोध दर्शवला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा सक्तीने घेण्याच्या निर्णयाबाबत पुर्नविचार करावा असे, पत्र युवासेनेने केंद्रीय मानव संशोधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना लिहिले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेणे धोकादायक ठरेल. अनेक विद्यार्थ्यांना कँपस मुलाखतीद्वारे नोकऱया व परदेशी शिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत. जर या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेतल्या गेल्या तर त्यांना त्या संधींना मुकावे लागेल. परीक्षांचा निकाल आणि त्यांचे पुनर्रमुल्यांकन या सगळ्या गोष्टींसाठी नोव्हेंबर ते डिसेंबर महिना उजाडेल, असे युवासेनेचे म्हणणे आहे.