मुंबई :जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा (Jitendra Awad Molestation case) दाखल झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी महिला आयोगाकडे केली आहे. तक्रार अर्जात म्हटले, की आमदार जितेंद्र आव्हाडयांच्यावर कलम ३५४ चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबावतंत्र वापरुन दाखल केला आहे. सदर गुन्हा रद्द करुन फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचे आदेश दिले (Women Commission orders Rupali Chakankar)आहेत.
महिला आयोगाचे रुपाली चाकणकर यांना आदेश कायदेशीर कारवाईची मागणी :ऋता जितेंद्र आव्हाड यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबावतंत्र वापरुन दाखल केला असल्याने सदर गुन्हा रद्द करुन फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी. असे त्यांनी त्यात नमूद केले (factual report in Jitendra Awad Molestation case)आहे.
विनायभंगाचा गुन्हा दाखल :नुकताच ' हर हर महादेव ' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अयोग्य आणि अनेतिहासिक बाबी घुसवल्या असे म्हणत चित्रपट जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला होता. त्यात एका प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड याना अटक झाली. जामीन देखील मिळाला. त्यानंतर आता एका महिलेने जितेंद्र आव्हाडांवर विनायभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्या तक्रारी आधारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंब्रा पोलिसांना नोटिस बजावली आहे.
राज्य महिला आयोगाकडे तक्रार :काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड इतर अनेक राजकीय नेते शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत विविध विकास प्रकल्पाचे उदघाटन भूमीपूजन कार्यक्रम ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळगर्दीत एक महिला आव्हाडांच्या समोर येत असताना त्यांनी त्या महिलेला हात धरून बाजूला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा 354 कलम अनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र हा विनयभंग प्रकार नाही ; अशी भूमिका घेत जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.
कायद्यानुसार तपासणी :त्या तक्रारीमध्ये सदर महिलेने खोटा गुन्हा माझ्या पती जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केला असल्यामुळे खोटा गुन्हा दाखल केल्याच्या संदर्भात त्या महिलेवर कायदेशीरकारवाई करावी ; अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे त्यांनी केली होती. याच तक्रारीच्या आधारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुंब्रा पोलिसांना नोटीस बजावत फिर्यादी महिलेने खोटा गुन्हा दाखल केल्या असल्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे म्हणत दोन्ही बाजूच्या अर्जाची कायद्यानुसार तपासणी करावी आणि ताबडतोब राज्य महिला आयोगाला त्याबाबत अवगत करावे, असे देखील आयोगाच्या पत्रात म्हटलेले आहे.
ऋता सामंतांची प्रतिक्रिया : जितेंंद्र आव्हाड यांच्यासाठी पत्नी ऋता सामंत पुढे आल्या ( Women Commission in Jitendra Awad case ) आहेत. त्यांनी ट्विटवर त्यांचे मत व्यक्त केले होते. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत त्या महिलेवर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात. रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडले ती स्पोन्टेनिअस रिऐक्शन होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही, असे ऋता सामंत यांनी म्हटले आहे.