मुंबई:राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे Bombay High Court मुख्य न्यायमूर्ती दीपन्कर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठांसमोर 22 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते यांचे वकील नितीन सातपुते यांनी खंडपीठांसमोर एक डिसेंबर रोजी मेन्शनिंग केल्यानंतर याचिका स्वीकारण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्याकरिता आज तारीख निश्चित करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.
वैयक्तिक आक्षेपार्ह टिप्पणी: मुख्य न्यायमूर्ती दीपन्कर दत्ता यांनी याचिकार्त्यांचे वकील नितीन सातपुते यांना विचारलं की, राज्यपाल यांना घटनात्मक संरक्षण आहे. ही याचिका का मान्य करावी ? त्यावर वकील नितीन सातपुते यांनी असे म्हटले की, राज्यपाल या पदाला घटनात्मक संरक्षण असलं, तरी ते वैयक्तिक आक्षेपार्ह टिप्पणी करत असेल तर त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला जाऊ शकतो, असे सांगितल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती यांनी म्हटले आहे. ही याचिका या मागणीवर आधारीत आहे का ? यावर वकील नितीन सातपुते यांनी म्हटले की याचिकेतील प्रमुख मागणी हीच आहे. त्यानंतर मुख्य मुख्य न्यायमूर्ती दीपन्कर दत्ता यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकारली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी लवकरच घेण्याचे निश्चित करण्यात येईल, असे मुख्य न्यायमूर्ती दीपन्कर दत्ता यांनी म्हटले आहे.