महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दसरा मेळावा!  शिवसेनेसाठी आता सत्ता हिच 'शीव' झाली आहे का? - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

होय मी सत्तेसाठीच युती केली! हे वाक्य आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे....तर दुसरीकडे युतीत मी सांगेन तेच अंतिम असेल असे दरडावून सांगणारे बाळासाहेब ठाकरे...ते फक्त बोलायचे नाहीत तर युतीत तसे भाजपला करायला भाग पाडायचे. पण आता तसे आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच मिळते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेने भाजपसमोर सपशेल लोटांगण घातलेले दिसते. काल परवापर्यंत मोठा भाऊ, मोठा भाऊ करणारी शिवसेना गपगुमाने छोटा भावाच्या भूमिकेत कशी गेली हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले.

दसरा मेळावा!  शिवसेनेसाठी आता सत्ता हिच 'शीव' झाली आहे का?

By

Published : Oct 8, 2019, 4:29 PM IST

मुंबई- एकेकाळी मुंबई-ठाण्यापुरती मर्यादीत असलेली शिवसेना आता गावागावात पोहोचली आहे. प्रत्येक दसरा मेळाव्याला सीमोल्लंघनाची गर्जना करणाऱ्या शिवसेना आणि ठाकरे यांनी स्वतःभोवती महाराष्ट्राची 'शीव' आखून घेतली होती. असे असले तरी सेनेचा आवाज पूर्ण भारतात ऐकला जायचा. मात्र आता लढाऊ सैनिकांची शिवसेना दरबारी राजकारण करायला लागली आहे. या शिवसेनेसाठी सत्ता हिच 'शीव' आहे का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक वेगळे नाते आहे. गेली 57 वर्षे एकाच मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. बाळासाहेब ठाकरेंना ऐकण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत होते. त्यांच्यासाठी ती एक पर्वणीच होती. मात्र आत्ताच्या आणि तेंव्हाच्या दसरा मेळाव्यात फरक आहे. तेव्हा शिवसेनेचा एक धाक होता. बाळासाहेबांचा शब्द अंतिम होता. आत्ताची शिवसेना तशी राहिली नाही. तडजोडीच्या राजकारणात ती अडकली आहे. सत्तेसाठी कमीपणा घेण्याची भूमिकाही शिवसेना सध्या घेताना दिसत आहे.

'मॉब लिंचींग' आपली संस्कृती नाही; हा शब्द पाश्चिमात्यांच्या धर्म ग्रंथात - मोहन भागवत

होय मी सत्तेसाठीच युती केली! हे वाक्य आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे. तर दुसरीकडे युतीत मी सांगेन तेच अंतिम असेल असे दरडावून सांगणारे बाळासाहेब ठाकरे. ते फक्त बोलायचे नाहीत तर युतीत तसे भाजपला करायला भाग पाडायचे. पण आता तसे आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच मिळते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेने भाजपसमोर सपशेल लोटांगण घातलेले दिसते. काल परवापर्यंत मोठा भाऊ, मोठा भाऊ करणारी शिवसेना गपगुमाने छोटा भावाच्या भूमिकेत कशी गेली हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले.

ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?

याची खरी सुरुवात २०१४ च्या निवडणुकीनंतरच झाली. भाजप सर्वात मोठा पक्ष झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत पक्ष राज्यात वाढवला. वेळ प्रसंगी शिवसेनेला शह देण्यात मागे पुढे पाहिले नाही. मुंबई महापालिकेतही शिवसेनेला दणका दिला. त्यानंतर पद्धतशीरपणे शिवसेनेला आपल्याच कलेने घ्यायला भाजप आणि फडणवीस यांनी भाग पाडले. लोकसभा निवडणुकीतही विधानसभेला समसमान वाटप या तत्वावर युती करण्यास भाग पाडले.

मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहारच्या प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पण भाजपची समसमानची व्याख्या थोडी वेगळी होती. ती शिवसेनेच्या लक्षातच आली नाही. विधानसभेच्या जागा वाटपात ती संपुर्ण महाराष्ट्राने पाहिली. भाजप तब्बल १६५ तर शिवसेना १२४ जागांवर लढण्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेनेचा राजकीय दृष्ट्या हा सर्वात मोठा पराभव मानावा लागेल. पण ते मान्य करायला उद्धव ठाकरे तयार नाहीत. ते उलट आपल्या निर्णयाचे समर्थन करत आहे. मात्र, त्यांचे हे समर्थन राजकीय पटलावर मस्करीचाच विषय ठरत आहे. ही एक तडजोड असल्याचेही सांगतात. शिवाय सत्तेसाठीच मी युती केली हेही ते सांगतात. कधी कधी तर मुख्यमंत्री तर शिवसेनेचाच होणार असेही ते सांगत आहे. मात्र, अजूनही शिवसेनेचा नक्की सत्तेतला वाटा काय हे भाजपने स्पष्ट केले नाही. त्यामुळे शिवसेनेची सध्याची स्थिती किती केवीलवाणी झाली आहे हे लक्षात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details