महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील विजय आयोध्येत दिवे लावून साजरा करू - योगी आदित्यनाथ - Maharashtra Assembly Elections 2019

जनतेच्या हितासाठी कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याचा विकास सुरू ठेवण्यासाठी मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांना जिंकून आणा, असे आवाहन योगी यांनी मुंबईकरांना केले. कांदिवली येथे युतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत आदित्यनाथ बोलत होते.

कांदिवलीतील प्रचार सभेत बोलताना योगी आदित्यनाथ

By

Published : Oct 11, 2019, 4:52 AM IST

मुंबई -राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. हा विजयोत्सव आम्ही आयोध्येत लाखो दिवे लावून साजरा करू, असा संकल्प उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील प्रचार सभेत केला.


कांदिवली येथे युतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत आदित्यनाथ बोलत होते. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी उत्तर प्रदेशातूनच गागाभट्ट यांना बोलावले होते. 24 ऑक्टोबरला आयोध्येत आम्ही 5 लाख 51 हजार दिवे लावणार असून त्याच दिवशी हरियाणा आणि महाराष्ट्रामधील विजय आम्ही साजरा करू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर योगी यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी राहुल गांधी आले नाहीत. आता निवडणुका आहेत, तर प्रचाराला येतील. त्यांच्या खोटारडेपणाला बळी पडू नका, असे आवाहन योगी यांनी केले.

हेही वाचा - प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या - राज ठाकरे


मोदी सरकारने राष्ट्रवाद आणला, आतंकवाद आणि नक्षलवाद संपवणे हेच आमचे ध्येय आहे. काँग्रेसच्या काळात मुंबईत हल्ले झाले. मोदी-फडणवीस यांच्या कार्यकाळात हल्ले झाले नाहीत. भाजप सरकार जिथे आहे, तिथे दंगे होत नाहीत. जनतेच्या हितासाठी कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याचा विकास सुरू ठेवण्यासाठी मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांना जिंकून आणा, असे आवाहन योगी यांनी मुंबईकरांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details