महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईकरांनी आता स्वतःची काळजी स्वत:च घ्यावी, या सरकारवर विश्वास उरला नाही - विजय वडेट्टीवार

मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा काळात सरकारकडून हव्या त्या उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. येत्या काही दिवसात असाच पाऊस राहिला तर मुंबईकरांना माझी विनंती आहे की, त्यांनी आता आपली स्वतःची स्वतः काळजी घ्यावी. हे सरकार आणि सत्ताधारी त्यासाठी काही करणार नाहीत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

By

Published : Sep 4, 2019, 8:47 PM IST

विजय वडेट्टीवार

मुंबई - पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे सेवा आणि इतर वाहतूक सेवा ठप्प पडली आहे. मुंबईत अनेक इमारती धोकादायक असून त्यासाठी हे सरकार काही करत नाही. त्यामुळे अशा सर्व संकटांमध्ये मुंबईकरांनी आता आपली स्वतःची काळजी घ्यावी, या सरकारवर आता विश्वास उरला नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज बुधवारी दिली.

मुंबईच्या पावसावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

मुंबईत कोसळत असलेल्या पावसावर वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितले की, पावसामुळे मुंबई वेळोवेळी तुंबत असते. महापालिकेत सत्तेत असलेल्या सेनेच्या भ्रष्टाचारी कारभाराचा हा एक उत्तम नमुना असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - पुन्हा मुंबईची तुंबई; दादर,वडाळा, नायगाव परिसरात पाणीच पाणी

मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा काळात सरकारकडून हव्या त्या उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. येत्या काही दिवसात असाच पाऊस राहिला तर मुंबईकरांना माझी विनंती आहे की, त्यांनी आता आपली स्वतःची स्वतः काळजी घ्यावी. तर, हे सरकार आणि सत्ताधारी त्यासाठी काही करणार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details