महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 22, 2020, 5:50 PM IST

ETV Bharat / state

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी विहिंप करणार जनआंदोलन

राज्यात रेल्वे, जिम, पब, मॉल मद्यकेंद्रे सर्व सुरू आहे. मग ज्या ठिकाणी शांतता असते, ते धार्मिक स्थळ बंद का, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेने केला आहे.

vhp-demand-to-opening-of-the-temple-in-maharashtra
मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी व्हिएचपी करणार जनआंदोलन

मुंबई -महाराष्ट्रात गेल्या सात महिन्यांपासून मंदिरे व तसेच सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. कोरोना काळात मानसिकदृष्या खचलेल्या भक्तांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घ्यायचे आहे. राज्यात सर्व व्यवहार सुरु केले असून मंदिरे मात्र बंद आहेत. वारंवार मंदिर उघडण्याची सर्व राजकीय व धार्मिक संघटनांनाी मागणी करून देखील मंदिरे खुली न झाल्याने 24 ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषद राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना श्रीराज नायर
देशातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यासह २५ राज्यांतील व सर्वच केंद्रशासित प्रदेशांतील देवस्थाने खुली करण्यात आली आहेत. पण महाराष्ट्रात मंदिरांच्या आधारावर जे व्यवसाय अवलंबून आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात बियर बार सुरू करण्यात आले असून त्यासाठी नियम आखून देण्यात आले आहे. मग मंदिरांसाठी नियम आखून ती खुली का केली जात नाहीत? सरकारने मंदिरे खुली केली नाहीत, तर सर्व महंत आणि भाविक मिळून आंदोलन करणार असल्याचे विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी सांगितले आहे.

...तर या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल- विश्व हिंदू परिषद

राज्यात रेल्वे, जिम, पब, मॉल मद्यकेंद्रे सर्व सुरू आहे. मग ज्या ठिकाणी शांतता असते ते धार्मिक स्थळ बंद का, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेने करत सरकारने लवकरात लवकर मंदिरे सुरू करावी, अन्यथा त्यानंतर होणाऱ्या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details