मुंबई - तेलंगणामधील तेलुगु भाषिक ज्येष्ठ कवी आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोप असलेले वरवरा राव यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथे जायला परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीमध्ये एनआयएनने त्याला विरोध केला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी हा अर्ज नाकारत खंडपीठाकडे पुन्हा अर्ज करण्यासाठीचे निर्देश दिले.
भीमा कोरेगाव या ठिकाणी 200 वर्ष पूर्ण होत असतानाच्या मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंसाचार झाला. त्या हिंसाचाराला कारणीभूत ज्येष्ठ कवी वरवरा राव असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक देखील केली होती. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय कारणासाठी न्यायालयात अर्ज केला व त्यांना अनेक दिवस सरकारी दवाखान्यात कोरोना महामारीच्या काळात दाखल करण्यात आले होते. सध्या ते जामिनावर आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरकडे करावी असा त्यांचा अर्ज होता. मात्र न्यायालयाने म्हटले आहे की, आपण ह्यावर निर्णय करू शकत नाही. त्यासाठी खंडपीठाकडे पुन्हा अर्ज करावा लागेल. कारण त्याला एकल खंडपीठ पुरेसे नाही.