महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2020, 1:28 PM IST

ETV Bharat / state

मुंबईत भाजीपाला बाजार सुरू; नागरिकांना दिलासा

शहरातील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच आजपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे देखील सर्व कामकाज नियमित करण्यात आले आहे. त्यामुळे, शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणार आहे.

corona affect thane
भाजी बाजार ठाणे

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन सुरू झालेला आहे. या काळात नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार, आज शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. या संदर्भात शहरातील, भायखळा भाजी बाजाराचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी..

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

लॉकडाऊन कालावधीत शहराला भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले होते. त्यानंतर आज शहरातील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच आजपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे देखील सर्व कामकाज नियमित करण्यात आले आहे. त्यामुळे, शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणार आहे.

हेही वाचा-#COVID 19 : पाडव्याच्या दिवशी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

ABOUT THE AUTHOR

...view details