महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 10, 2019, 9:28 AM IST

ETV Bharat / state

वंचितमुळेच इम्तियाज जलील औरंगाबादचे खासदार - आनंदराज आंबेडकर

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वंचितला भाजपची बी टीम म्हटले होते. यावर आनंदराजआंबेडकर यांनी भाष्य करताना म्हटले बी टीम कोण आहे हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.

आनंद आंबेडकर

मुंबई - विक्रोळी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ मोकळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वंचितचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे वंचित आघाडीमुळे निवडून आले आहेत.

हेही वाचा - 'क्वात्रोची'ला पुजणाऱ्या पक्षाला 'शस्त्रपूजा' करणे नकोसे वाटणारच, भाजपची टीका

राज्यातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाची आघाडी होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली. यामुळे वंचितवर याचे किती नुकसान होणार यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मुस्लीम समाजामध्ये असा एक समज झालेला आहे की वंचित बहुजन आघाडीमुळे समाजाला न्याय मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्व मुस्लीम समाज काँग्रेससोबत गेला त्यामुळे वंचित व एमआयएमच्या जागेला मोठ्या प्रमाणात फटका बसला. हाच मुस्लिम समाज औरंगाबाद मध्ये काँग्रेसला समर्थन न करता एमआयएमच्या जलील यांना जलील निवडून आले आहेत.

हेही वाचा - आमची सत्ता आली तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ - शरद पवार

देशभरातील वेगवेगळ्या निवडणूक निकालामध्ये मुस्लीम समाजाने काँग्रेस, आप, ममता बॅनर्जीच्या पक्षासोबत गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी मुस्लीम समाजातील उमेदवार निवडणूक हरले असल्याने मुस्लीम समाज जागृत झाला असून कोणत्याही एका राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याने नुकसान होत आहे. यामुळे मुंबईतील उलेमा कोनसिलने राज्यातील वंचितच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असल्याने वंचित आघाडीचे मताधिक्य वाढत असल्याने राज्यात वेगळे परिवर्तन होणार हे निश्चित झाले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वंचितला भाजपची बी टीम म्हटले होते. यावर आंबेडकर म्हणाले बी टीम कोण आहे हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. तसेच लोकसभेमध्ये काँग्रेसने काही ठिकाणी उमेदवार दिले नसते तर वंचित बहुजन आघाडीचे दहापेक्षा जास्त खासदार निवडून येऊ शकले असते. असेही ते म्हणाले.

हेही वाचा - देशमुख बंधू काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात ठरू शकतात प्रभावशाली?

ABOUT THE AUTHOR

...view details