महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साध्वी प्रज्ञावर भाजपने कारवाई करावी; मुंबईत विविध संघटनांचे उपोषण

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होते, असे वक्तव्य केल्यानंतर अनेक स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

By

Published : May 18, 2019, 8:10 PM IST

साध्वी प्रज्ञावर भाजपने कारवाई करावी म्हणून मुंबईत विविध संघटनांचे उपोषण


मुंबई -साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होते, असे वक्तव्य केल्यानंतर अनेक स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, तर महात्मा गांधी देशद्रोही होते का? असा प्रश्न मांडत मुंबईतील काही समाजसेवी संघटनांनी एकत्र येत आज (१८ मे) उपोषण केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपने कारवाई करावी, अशी मागणी या समाजसेवी संघटनांनी केली आहे. साध्वींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फोडून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतल्या काही समाजसेवी संघटनांनी एकत्र येऊन साध्वींच्या वक्तव्याचा निषेध केला.

साध्वी प्रज्ञावर भाजपने कारवाई करावी म्हणून मुंबईत विविध संघटनांचे उपोषण

साध्वींनी केलेल्या वक्तव्यानंतर नरेंद्र मोदी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. त्यांना मनातून कधीच माफ करणार नसल्याचेही ते म्हणाले होते. तरीही साध्वीने केलेल्या वक्तव्यावरून भाजपने तिला पक्षातून काढायला हवे होते, अशी इच्छा मुंबईतील आज उपोषण केलेल्या काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. एखादी अशी व्यक्ती जी काहीही बरळते तिला पक्षात ठेऊ नका, अशी ठाम भूमिका भाजप का घेत नाही? असा प्रश्न देखील आज उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रपिताबाबत असे वक्तव्य करणारा एखादा माथेफिरूच असू शकतो. अशा व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली आहे. काहीही तथ्ये नसलेली वक्तव्ये करण्यात प्रसिद्ध असलेल्या साध्वीवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मुंबईत उपोषण केलेल्या सामाजिक संघटनेतील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, फिरोज मिठी बोरवाला, वर्षा शिंदे, नितीन मादामे, अशा अनेक समाजसेवी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details