महाराष्ट्र

maharashtra

भाजप नेत्यांनी देशातील संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे - उदय सामंत

By

Published : Dec 3, 2019, 8:25 PM IST

भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा देशातील भाजप वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी भाजपला दिला.

आमदार उदय सामंत
आमदार उदय सामंत

मुंबई- भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा देशातील भाजप वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला रत्नागिरीचे आमदार तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना दिला आहे.

बोलताना आमदार उदय सामंत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच 72 तासांत प्रथम आरेतील व नाणार प्रकल्पातील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेतले. भाजप युवा मोर्चाचे नेते मोहित भारतीय (कंबोज) यांनी नाणार व आरेतील आंदोलनकर्त्यांची तुलना दाऊदशी करत त्यांचे गुन्हे देखील मागे घ्या, अशी टीका केली. त्यावर सामंत यांनी पलटवार करत गेले 5 वर्षे भाजपकडे संधी असूनही काम करता आले नाही, असे म्हटले.


जे काही महाराष्ट्रात घडले ते आता देशभर घडणार आहे. शिवसेनेने कोणासोबत युती केली याबाबत भाष्य करण्यापेक्षा आपला पक्ष यापुढे प्रत्येक राज्यात कसा टिकेल याचा विचार करावा, असे सामंत यांनी म्हटले.

हेही वाचा - 'आरे' आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details